No icon

Pune : Daksh Police Times

महायुतीला घरातूनच आव्हान, बच्चू कडू म्हणाले ”वेळ पडल्यास बाहेर पडू”

आमचे कार्यकर्ते फोन करून सांगत आहेत की, त्यांना मतदारसंघात कुठलीही विचारणा होत नाही. मग आम्हाला तरी कुठे त्यांची गरज आहे. आम्ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नाही. राज्यात आमची स्वतंत्र ताकद आहे. जी वेळ पडल्यास दाखवून देऊ. वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू, प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करू, असे आव्हान प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी महायुतीला दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू कडू हे त्यांच्या पक्षाच्या बैठका घेत आहेत. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, आम्हाला राज्यभरातून कार्यकर्त्यांचे फोन येत होते की, महायुतीत आपल्याला कुठल्याही प्रकारची विचारणा होत नाही, आपल्याला केवळ मतांपुरते गृहित धरले जात आहे. आपण त्याचा बदला घेतला पाहिजे. त्यासाठी आपण निवडणुकीला उभे राहिले पाहिजे. एकंदरित अशा प्रकारची आमच्या कार्यकर्त्यांची मते आहेत.

 

बच्चू कडू पुढे म्हणाले, प्रहारची राज्यात एवढी ताकद असूनही आम्हाला निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने वागवले जात आहे
ते चुकीचे आहे. अशा पद्धतीने आम्हाला वागवले जात असेल, आमच्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळत नसेल तर
आम्ही वेगळा निर्णय घेऊ. काय निर्णय घ्यायचा, कसा घ्यायचा हे आम्ही आजच्या बैठकीत ठरवू.

ते पुढे म्हणाले, वेळ पडल्यास प्रत्येक मतदारसंघात आमचा उमेदवार उभा करू. शेतकरी, मजूर, गोरगरिब, वंचित
आणि दलितांची मदत करणारा एखादा कणखर उमेदवार असेल तर आम्ही त्याच्या पाठिशी उभे राहू.

बच्चू कडू म्हणाले, आमची महायुतीला सहाय्य करण्याची तयारी होती. परंतु, एकंदरीत त्यांनाच आम्ही त्यांच्याबरोबर
नको आहोत. त्यांना आम्ही नको आहोत तर आम्ही त्यांना आमचा झटका दाखवू, वेळ पडल्यास दणका देऊ.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी मी खासदार अभियानाची घोषणा केली होती.
याअंतर्गत प्रत्येक मतदारसंघात ३०० ते ४०० उमेदवार उभे केले जाणार आहेत.
बच्चू कडूंच्या या अभियानामुळे भाजपसहित निवडणूक आयोगाची चिंता वाढू शकते.

Daksh police times

Comment As:

Comment (0)