वारजे तपोधाम परिसरात अतिवृष्टी मुळे मुठा नदीचे पाणी सदर परिसरातील नागरिकांच्या घरात शिरल्याने येथील ३५ कुटुंबांना या पाण्यातून सुरक्षीत पणे बाहेर काढून त्यांना वारजे पुला येथील असलेले पाटलु चौधरी या शाळेत स्थलांतरित केले गेले आहे . सदर कुटुंबांतील नागरिकांशी चर्चा व पाहणी करून त्यांची लवकरात लवकर योग्य ती व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यानं देण्यात आले . यावेळी नागरिकांशी संवाद साधताना मा.नगरसेवक श्री प्रदीप उर्फ बाबा धुमाळ , प्र क्र ३१ चे आरोग्य निरीक्षक साहेब , श्री अरुण पाटील , श्री अतुल साखरले , श्री गणेश बांदल , इतर सेवक वर्ग व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते